आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह कोसळणार सरी, या जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला इशारा


नागपूर, 12 जानेवारी : गेल्या तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. ऐन हिवाळ्यात पाव पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे पाऊस थांबत नाही. राज्यात आणखी तीन दिवस पाऊस सुरू आहे. येत्या तीन दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. हवामान खात्याने विदर्भातील सात जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने आज नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन ते तीन तासांत मेघगर्जेनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाऱ्याचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सतर्क झाले आहेत. पुढील तीन दिवस राज्यात हीच परिस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरली? मुंबईत कोविड बाधितांच्या संख्येत अचानक मोठी घसरण


Piyush Kakulate is a senior Editor with two years of experience in journalism. He is a seasoned journalist with a wealth of knowledge and expertise in his field. Piyush is known for his sharp analytical skills and his ability to break down complex issues into simple terms. He has a keen interest in politics, business, and technology, and is always on the lookout for breaking news in these areas.

Leave a Comment